Site icon सक्रिय न्यूज

राज्य सरकारचा मोठा निर्णय, अतिवृष्टी संबंधी मदत जाहीर…….!

राज्य सरकारचा मोठा निर्णय, अतिवृष्टी संबंधी मदत जाहीर…….!

मुंबई दि.१३ – राज्यातल्या पूरग्रस्त तसंच अतिवृष्टी बाधितांसाठी आता ठाकरे सरकारने मोठी मदत जाहीर केली. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली. त्यानुसार अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना १० हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ या काळात आलेल्या पूरामुळे तसंच अतिवृष्टीमुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक शेतीपिकांचं नुकसान झालं. त्यामुळे एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आपण मदत जाहीर केल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं.

दरम्यान,जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर, ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येणार आहे.

 

शेअर करा
Exit mobile version