Site icon सक्रिय न्यूज

सोयाबीन झाकण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू….!

सोयाबीन झाकण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू….!

Oplus_131072

केज दि.२१ – शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनचा ढिगारा पावसात भिजू नये म्हणून झाकून ठेवत असताना अंगावर वीज पडून एका 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कळंब तालूक्यातील भाटशिरपुरा येथे घडली.
         सध्या सोयाबीन काढणीने वेग घेतला आहे. कांही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून शेतात ढीग घालून ठेवले आहेत. मात्र दि. 21 सप्टेंबर रोजी दुपारपासून तालुक्यातील विविध भागात जोरदार पाऊस सुरू झाला आहे.
                         दरम्यान, काढून ठेवलेले सोयाबीन भिजू नये म्हणून भाटशीरपूरा येथील अजय आसाराम गायकवाड हा तरुण शेतातील काढलेले सोयाबीन झाकण्यासाठी गेले असता अंगावर विज पडली आणि त्यातच अजयचा याचा जागीच मृत्यू झाला. सदरील घटनेमुळे अजयच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शेअर करा
Exit mobile version