Site icon सक्रिय न्यूज

दोन दिवसांत निर्बंध लागू होणार -राजेश टोपे

दोन दिवसांत निर्बंध लागू होणार -राजेश टोपे
मुंबई दि.२४ – दिवाळीनंतर राज्यातील कोरोना रोगाचा फैलाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची वाढत आहे. त्यामुळे राज्यात शिथिल केलेले निर्बंध पुन्हा लावणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

राजेश टोपे म्हणाले की, राज्यात सध्यातरी लॉकडाऊन लावले जाणार नाही. मात्र जे निर्बंध उठवले गेले आहेत, त्यामुळे बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत आहे.राज्यात निर्बंध लावण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळली जात नसल्याने राज्य सरकार कठोर निर्णय घेणार आहे.दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर याबाबत घोषणा केली जाणार असल्याचेही, राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version