Site icon सक्रिय न्यूज

बर्ड फ्लू च्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील 9 गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित, जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे आदेश…….!

बीड दि.११ – बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव हिमाचल प्रदेश, केरळ, मध्यप्रदेश, राज्यस्थान या राज्यांतील स्थलांतरित पक्षांमध्ये आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये देखिल काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आले आहेत. त्यासंदर्भात विविध वृत्तपत्रे, दुरचित्र वाहिण्या, सोशल मिडियांवरुन बातम्या व माहिती प्रसारित होत आहे. त्याअनुषंगाने माध्यमांना या बाबतीतील  अधिकृत माहिती देण्यासाठी बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. 
                 बीड जिल्ह्यातील मुगगाव तालुका पाटोदा येथे दिनांक 07/01/2021 रोजो 11 कावळे मृत स्थितीत आढळून आले आहेत. त्यापैकी 3 कावळयांचे शव रोग निदानासाठी, रोग अन्वेषण विभाग, पुणे मार्फत NISHAD, भोपाळ येथे पाठविण्यात आले होते. सदरीन नमुने बर्ड फ्लू (H5NS) पाझिटिव्ह आले आहेत. त्या अनुषंगाने सदर क्षेत्रास संसर्गग्रस्त क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात येत असून, तेथे निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
       दरम्यान सर्व पोल्ट्री धारक व सर्व सामान्य जनतेस, जिल्ह्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे. पोपट. बगळे, किंवा स्थलांतरीत होणाऱ्या पक्षांमध्ये मतुक झाल्याचे आढळून आल्यास किंया व्यवसायीक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मर्तुक झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाण्यास माहिती द्यावी. मृत पक्षास हात लावू नये, शव विच्छेदन करु नये किंवा परस्पर विल्हेवाट लावू नये असे कळवण्यात आले आहे.
             प्राण्यांमधील संक्रामक व संसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 च्या कलम 4 (1) अन्वये प्रत्येक पशुपालक अथवा इतर कोणतीही व्यक्ती, शासनेत्तर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत, पशुपालक ज्यांना नमुद कायद्याशी सलग्न असणाऱ्या अनुसूचितील रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास त्या वस्तुस्थितीची माहिती नजिकच्या ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामपंचायत प्रभारी यांना देणे व ही माहिती नजीकच्या उपलब्ध पशुवैद्यकीय दवाखाण्यास लेखी स्वरुपात कळविणे बंधनकारक असणार आहे. बर्ड फ्लू चा झालेला उद्रेक आहे त्याच ठिकाणी नियंत्रित करण्याकरिता जिल्ह्यातील प्रत्यकाने दक्षता घेणे आवश्यक आहे.परंतू अंडी व कुक्कुट मांस किमान 70C तापमानावर 30 मिनिटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने अंडी व पोल्ट्री
मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षीत आहे.
               बर्ड फ्लू रोगाबद्दल शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरविण्यात येवू नये असेही नमूद करण्यात आले आहे.
ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित……!
पाटोदा तालुक्यातील अंतापूर, वाहली, चिखली, सुप्पा सावरगाव, निवडुंगा, भुरेवाडी जोगदंड, वसंत वाडी तसेच आष्टी तालुक्यातील ब्रम्हगाव, पांगुळगव्हाण इत्यादी गावे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून सदरील गावातील कुक्कुट पक्षांची खरेदीविक्री, वाहतूक, बाजार व जत्रा प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
शेअर करा
Exit mobile version