Site icon सक्रिय न्यूज

पत्रास कारण की, मुख्यमंत्री साहेब माझे लग्न करून द्या……. एका त्रस्त तरुणाचे भावनिक पत्र…….!

बीड दि.१२ – कुणाच्या डोक्यात कधी काय येईल अन कुणाकडे काय मागणी करतील याचा नेम राहिलेला नाही. अधून मधून काही चमत्कारिक अन तेवढेच वास्तव किस्से पाहायला मिळतात. आणि याचाच एक भाग म्हणून वाशिमच्या गजानन राठोड  या युवकाने मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे.

पत्र लिहिण्यास कारण की,“माझं वय 35 वर्ष असून माझं लग्न झालेलं नाही. त्याचं कारण गेल्या 7 वर्षांपासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. पण कमी गुणांमुळे मला नोकरी मिळाली नाही. जिथे मुलगी बघायला जातो, तिथे मुलाला नोकरी नोकरी असावी ही अट असते. पण तुम्ही आतापर्यंत नोकरीच्या जागा काढल्या नाहीत. त्यामुळे जॉब मिळणे कठीण झाले आहे” अशी खंत वाशिमच्या गजानन राठोडने पत्रात व्यक्त केली आहे. आपण मला एकतर जॉब द्यावा. अन्यथा माझे एखाद्या मुलीशी लग्न करुन द्यावे, ही नम्र विनंती

दरम्यान याआधीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनतेने लिहिलेली पत्र लक्षवेधी ठरली आहेत.

शेअर करा
Exit mobile version