Site icon सक्रिय न्यूज

येत्या दोन दिवसांत हादरे देणारी पत्रकार परिषद घेऊन “या” विषयी मोठे खुलासे करणार – चंद्रकांत पाटील यांनी केले जाहीर……!

येत्या दोन दिवसांत हादरे देणारी पत्रकार परिषद घेऊन “या” विषयी मोठे खुलासे करणार – चंद्रकांत पाटील यांनी केले जाहीर……!

मुंबई दि.१९ – ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच सर्वाच मोठा पक्ष ठरला असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ग्रामपंचायत निवडणुकींच्या निकालावर भाजपची भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघांतील गैरप्रकारांबाबत मोठा दावा केला आहे.

पदवीधर निडणुकीत महाविकास आघाडीने गैरप्रकार केले. या निवडणुकीतील गैरप्रकारांचा उलगडा करणारी मोठे हादरे देणारी पत्रकार परिषद मी येत्या दोन दिवसांत घेणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.काही ठिकाणी एकाच व्यक्तीची नावे मतदार यादीत अनेकदा आलेली होती. काही ठिकाणी कोऱ्या मतपत्रिका आल्या, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

शेअर करा
Exit mobile version