Site icon सक्रिय न्यूज

जिल्ह्यात निर्बंध कठोर……..!

जिल्ह्यात निर्बंध कठोर……..!
बीड दि.१७ – तिसऱ्या कोवीड लाटेच्या संभाव्य पार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासनाने रुग्ण संख्या लक्षणीयरीत्या कमी होत नाही अशा तालुक्यामध्ये कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरी लाट जिल्ह्यामधील बहुतांश तालुक्यांमध्ये आटोक्यात आली आहे. तथापि आष्टी, पाटोदा आणि गेवराई या तालुक्यांमध्ये आज रोजी रुग्णांची संख्या ही अपेक्षेप्रमाणे आटोक्यात येताना दिसत नाही. या तीन तालुक्यांमध्ये शासन निर्देशाप्रमाणे पूर्वीपासून सर्व दुकाने उघडी ठेवण्याची वेळ सकाळी 07.00 ते दुपारी 04.00 वाजेपर्यंत होती. ती सकाळी 07.00 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत कमी करण्यात आले असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने आदेशीत केले आहे.
                तीन तालुक्यांमध्ये आवश्यक असलेल्या सेवा सोमवार ते रविवार या सर्व दिवशी सकाळी 07.00 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत सुरू राहतील तर आवश्यक सेवा व्यतिरिक्त इतर सर्व व्यापारी अस्थापना या सोमवार ते शुक्रवार या दिवशीच सकाळी 07.00 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत सुरू राहतील तर शनिवार आणि रविवार या दिवशी अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त इतर सर्व व्यापारी आस्थापना पूर्णपणे बंद राहतील. त्याचबरोबर विना मास्क रस्त्यांवर फिरणारे नागरिक आणि वेळेच्या नंतर ही दुकाने उघडी ठेवणारे दुकानदार यांच्यावर योग्य ती प्रभावी आणि परिणामकारक दंडात्मक कारवाई करण्याच्या अनुषंगाने तहसील पातळीवरती स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासन यांचे प्रतिनिधी असलेली फिरती पथके कार्यान्वित करण्यात आली असून त्यांनी प्रभावी आणि परिणामकारक अशी दंडात्मक कारवाई करणे बाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच यापूर्वीच सर्व आरोग्य यंत्रणा व क्षेत्रीय पातळीवरील यंत्रणेला सूचित करण्यात आले आहे की, कोणत्याही परिस्थितीमध्ये कोवीड-19 बाधित रुग्ण होम आयसोलेशन अर्थात गृह विलगीकरण यामध्ये राहण्याची परवानगी देता येणार नाही. याअनुषंगाने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की कोणताही कोवीड-19 बाधित रुग्ण जर त्याच्या घरी राहत असेल तर त्याबाबतची सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला अथवा तालुका प्रशासनाला स्थानिक अधिकाऱ्यांना द्यावी. covid-19 दुसरी लाट आटोक्यात येत असताना तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती उपाययोजना करत असताना नागरिकांनी कोवीड-19 प्रतिबंधात्मक योग्य वर्तन करून साथ दिली पाहिजेत, मास्कचा अधिकाधिक वापर केला पाहिजे आणि त्याच बरोबर गर्दीची ठिकाणी जाणे टाळले पाहिजेत.
       दरम्यान लग्न समारंभ व अत्यंविधी यासारख्या प्रसंगांमध्ये असलेली मर्यादा काटेकोरपणे पाळली पाहिजे. प्रशासन आणि जनतेच्या सहकार्याने कोवीड-19च्या लाटेवरती नियंत्रण मिळवता येऊ शकेल त्याकरिता
प्रशासनाला जनतेने योग्य असे सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे व बदललेल्या निबंधाच्या पार्श्वभूमीवरती जनतेने या सर्व निर्बंधांचे कसोशीने पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
शेअर करा
Exit mobile version