Site icon सक्रिय न्यूज

लाखो उमेदवारांचा हिरमोड, आरोग्य विभागाची परीक्षा रद्द……!

लाखो उमेदवारांचा हिरमोड, आरोग्य विभागाची परीक्षा रद्द……!

मुंबई दि.24 –  उद्या (दि.२५) आणि परवा (दि.२६) होणार्‍या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर लागलेल्या बोलीच्या चर्चा आणि ज्या कंपनीकडे या परिक्षेचे कंत्राट देण्यात आले होते. त्या कंपनीतील अवमेळ या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागातीलप रिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही घोषणा केली.
राज्याच्या आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु असून त्यासाठी उद्या आणि परवा होणार होत्या. मात्र या परिक्षेपूर्वीच अनेक गोंधळ समोर आले होत. शुक्रवारपर्यंत अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्रच उपलब्ध होत नव्हते. तर अनेक जिल्ह्यात या पदांसाठी दहा ते पंधरा लाखाची बोली लावली गेल्याची चर्चा होती. त्यातच वेगवेगळ्या जिल्ह्यात परिक्षांचे वेळापत्रक वेगवेगळे ठेवण्यात आल्याचेही समोर आले होते. ज्या कंपनीकडे परिक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. त्या कंपनीने प्रश्‍नपत्रिका वितरीत करण्यासाठी आणखी एका कंपनीला पोट कंत्राट दिल्याचा प्रकारही समोर आला होता. या सार्‍या प्रकारामुळे या परिक्षांच्या पारदर्शकतेवर प्रश्‍नचिन्ह लागले होते. या सार्‍या पार्श्‍वभूमीवर आता या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घेतला आहे. टोपे यांनी या संदर्भात मुंबईत घोषणा केली आहे.
स्थानिक अधिकारी मात्र अजूनही या संदर्भातील अधिकृत निर्णयाची वाट पहात असून जोपर्यंत कागदोपत्री आदेश येत नाहीत तोपर्यंत आम्ही काही बोलू शकत नाही अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. यापूर्वीदेखील खाजगी कंपन्यांकडे परिक्षांचे कंत्राट गेल्यानंतर मोठे गोंधळ निर्माण झाले होते. दोन वर्षापूर्वी महाएक्झाम विरोधात विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केली होती. आता पुन्हा एकदा खाजगी कंपनीचा अवमेळ बेरोजगांच्या मुळावर उठला आहे.

शेअर करा
Exit mobile version