Site icon सक्रिय न्यूज

पाण्याचा अंदाज न आल्याने केज तालुक्यातील दोघे गेले वाहून……!

केज दि. 27 – मागच्या कांही दिवसांपासून बीड जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू आहे.अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच पाण्याचा अंदाज न आल्याने आणखी एका दुर्दैवी घटनेची भर पडली असून धारूर चिंचपूर नदी मध्ये दोघे वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.
          उंदरी येथील दोघेजण पुलावरून वाहून गेले असून एकाचा मृतदेह सापडला आहे तर एकजण बेपत्ता असल्याची माहिती आहे.धारूर पोलीस व प्रशासनाचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले असून महादेव सोनवणे व उत्तम सोनवणे रा. उंदरी ता. केज अशी वाहून गेलेल्या व्यक्तींची नावे आहेत. नेमकी घटना कशी घडली हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही.
शेअर करा
Exit mobile version