हवामान

16 ते 18 दरम्यान ‘या’ जिल्ह्यांत पुन्हा कोसळणार…….!

मुंबई दि.१४ – राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. संपूर्ण राज्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. कोकणासह मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. राज्यात पुन्हा एकदा 16 ते 18 दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

विदर्भात आणि मराठवाड्याच्या काही संलग्न जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने परभणी, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. यासोबतच नागपूर, अमरावती, यवतमाळ, गोंदिया, वाशिम, अकोला, नांदेड या जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच रविवारी राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता आहे. वातावरणातील आद्रता कमी होत असल्यामुळे लवकरच परतीचा पाऊस संपणार असल्याचं दिसतंय.

दरम्यान, मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रूपयांच्या नुकसानीला सामोर जावं लागतंय. राज्यातला परतीचा पाऊस संपून लवकरच थंडीला सुरूवात होणार आहे, असं हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितलं आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close