आरोग्य व शिक्षण

रहिवाशी आक्रमक……नगरसेवकाला बसवले गटाराच्या पाण्यात……!

मुंबई – स्थानिक नागरिकांच्या समस्या न सोडवणं एका नगरसेवकाला चांगलंच महागात पडलं आहे. समस्या न सोडवल्यामुळे नागरिकांनी नगरसेवकाला थेट गटाराच्या पाण्यात बसवल्याची घटना वाराणसीच्या बलुवाबीर मध्ये घडली आहे.

बलुवाबीर परिसरातील स्थानिक नागरीक गेल्या अनेक दिवसांपासून गटार आणि दूषित पाण्याच्या समस्येची तक्रार घेऊन नगरसेवकाकडे जात होते. मात्र सातत्याने नागरिकांच्या समस्यांनकडे दुर्लक्ष केल्यानंतर नागरिक आक्रमक झाले आणि त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. बऱ्याच दिवसांपासून गटारातील पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना त्रास होत होता. मात्र नगरसेवकाने त्यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नाही. अखेर त्याच पाण्यात नगरसेवकाला एका दोरीने खुर्चीवर बांधून बसवण्यात आलं.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close