#Social

ऊस पेटवून देत शेतकऱ्याची आत्महत्या…..!

9 / 100

गेवराई- जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला असून ऊस शेतातच उभा असल्यामुळे आज (दि.११) दुपारी १ च्या सुमारास शेतकऱ्याने ऊस पेटवून देत शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

नामदेव आसाराम जाधव (वय-35 रा.हिंगणगाव ता.गेवराई) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.बीड जिल्ह्यातील  हजारो हेक्टरवरील ऊस अद्यापही शेतकऱ्यांच्या शेतात ऊभा आहे. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट असून आपल्या शेतातील ऊस कारखाना नेईल की नाही ? हि शाश्वती नसल्याने शेतकरी नैराश्येत आहे. यामधूनच गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील नामदेव जाधव यांनी कारखान्याकडे वेळोवेळी ऊस घेऊन जाण्याबद्दल विनंती केली. मात्र अद्यापही ऊस तोडून न नेल्याने त्यांनी आज बुधवारी दुपारी शेतातील उभ्या ऊसाला नैराश्यातून आग लावली. यानंतर शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून अतिरिक्त ऊसाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close