राजकीयब्रेकिंग

16 आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा…..!

7 / 100
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा  निकालाच्या वाचनाच्या वेळी सर्वोच्च न्यायलयाने तीन महत्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. ही तीन निरीक्षणं ठाकरेगटाच्या बाजूने नोंदवली आहेत. शिंदे गटाच्या प्रतोदपदी भरत गोगावले यांची केलेली नियुक्ती बेकायदेशीर आहे. गटनेत्यापेक्षा पक्षाचा व्हीप महत्वाचा आहे. शिंदे गटाने कुठल्याही पत्रात पाठिंबा काढला , असं म्हटलं नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
बहुमत चाचणी पक्षांतर्गत वादासाठी हत्यार म्हणून वापरू शकत नाही. राज्यपालांकडे कोणतेही ठोस पुरावे नव्हते. राज्यपाल यांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
खरी शिवसेना कोण याचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे असेल. खरी शिवसेना कोण याचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
          दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर कोर्टाने सरकार परत आणलं असतं असं सरन्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने ठाकरे गट अडचणीत आला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close