आपला जिल्हा

मांजरा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा….!

6 / 100
केज दि.12 – बीड, लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांची तहान भागवणारे मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
            अधिक माहिती अशी की, दि. ९ सप्टेंबर २०२४ रोजीची दुपारी ३ वाजताची मांजरा धरणाची पाणी पातळी ६४१.३ मी. असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा ७५.५३ टक्के आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) अशीच पर्जन्य वृष्टी राहून येवा (Inflow) असाच राहीला तर केंव्हाही धरण निर्धारीत पातळीस भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर धरणात येणारा येवा मांजरा नदीमार्गे सोडावा लागणार आहे.
               दरम्यान, मांजरा नदी काठावरील शेतकरी किंवा नदीकाठी वस्ती करून राहीलेले नागरीक यांना सावधानतेचा इशारा अ. न. पाटील (कार्यकारी अभियंता लातूर पाटबंधारे विभाग क्र.1 लातूर ) यांनी दिला असून पुढील कार्यवाहीसाठी बीड, लातूर, धाराशिव आणि बिदर (कर्नाटक) जिल्हाधिकारी यांना माहिती देण्यात आली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close