खासदार रजनीताई पाटील, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना तत्काळ भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधत विषयाचे गांभीर्य लक्षात घेता तत्काळ कारवाई करण्याची विनंती केली व आंदोलन कर्त्याना उपोषण सोडण्याची विनंती केली. आंदोलनकर्त्यांनीही सहमती दर्शवत राहुल सोनवणे व प्रशासनातील अधिकारी यांच्या उपस्थितीत लिंबू शरबत घेऊन उपोषण मागे घेतले. त्याचबरोबर आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ घेऊन जलसंपदा मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील व संबंधित अधिकार्यांशी भेट घालुन देण्याचेही आश्वासन दिले.