मागील आठवड्यापासून सतत पावसाचा जोर वाढला आहे. नदी, नाल्यांना पूर आल्याने नदी काठच्या जमिनी पिकांसह वाहून गेल्या आहेत. तर शेतात पाणी साचल्याने पाण्याचे तळे साचले आहे. काढणीला आलेल्या सोयाबीन पिकात पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतलेली शेतकरी वर्ग हताश झाला आहे. मंगळवारी केज पंचायत समितीचे माजी सभापती विष्णू घुले यांनी डोणगाव, शिरपुरा शिवारात चिखल तुडवत बांधावर नुकसानीची पाहणी करीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला.
दरम्यान, प्रशासनाने तालुक्यातील पिकांच्या नुकसानीचे सरगट पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी ही विष्णू घुले यांनी केली. यावेळी कोरेगावचे तलाठी जी. डी. नादरगे, टाकळीचे तलाठी कुथवाडे यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.