महाराष्ट्र

अखेर ”या” मुहूर्तावर उघडणार मंदिरं व इतर प्रार्थनास्थळांचे दरवाजे…….!

बीड दि.14 – मागच्या आठ महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे व इतर सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे दिवाळी पाडव्याच्या (सोमवार) मुहूर्तावर उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला असून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
         कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉक डाउन मध्ये सर्व प्रार्थनास्थळांना सुद्धा टाळे लागले होते.त्यामुळे लाखो लोकांच्या हातचे काम गेल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. दरम्यान मागच्या दोन महिन्यांपूर्वी कांही अंशी उद्योगांना सूट दिल्यानंतर प्रार्थनास्थळे उघडण्याची मागणी भविकांसह विरोधी पक्षांनी केली होती. 
दरम्यान या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत असून सरकार एकीकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता येणार असल्याचे सांगत असताना आत्ताच मंदिरे का उघडली असेही बोलल्या जात असून काहींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.मात्र मंदिरात जाताना मास्क लावणे, सोशेल डिस्टनसिंग पाळणे यासह इतर नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे निर्देशित करण्यात आले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close