
ग्रामीण भागाचा सर्वागीण आणि व्यापक विकास घडून यावा या हेतूने आणि विशेषत: समाजातील अविकसित स्तराच्या विकासावर भर देण्याच्या दृष्टीने शासनाने सामाजिक व आर्थिक विकासाचे अनेक कार्यक्रम हाती घेतले आहेत. या कार्यक्रमाचे यश हे सर्वस्वी ते कशा पध्दतीने कार्यान्वीत केले जातात आणि या कार्यक्रमाशी संलग्ल असलेले स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक पुढाकार यांचेवर अवलबून असते हे लक्षात घेवून शासनाने तालुका पातळीवर संदर्भिय निर्णयानुसार एकात्मिक विकासासाठी तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती स्थापन करणेचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार केज तालुका स्तरीय समन्वय व पुनर्विलोकन खालील प्रमाणे गठीत करण्यात येत आहे. या समितीवर सुमेधा शेप व परिमाला घुले यांची निवड करण्यात आली आहे.