महाराष्ट्र

नेमकं काय म्हणालेत हे आमदार महोदय ? वारकरी संप्रदायाने काय दिलाय इशारा…..?

बुलडाणा दि.१२ –  उपास-तापासाची ही वेळ नाही. रोज अंडे आणि मटन खा. कोरोना झाल्यावर देव वाचवणार नाही, असं शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय. यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. संजय गायकवाड यांनी एका स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केल्याचं कळतंय. संजय गायकवाड यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर वारकऱ्यांमधून संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच  एका वारकऱ्याने आमदार संजय गायकवाड यांना फोन केल्यानंतर त्यांच्यासोबत अर्वाच्च भाषेत त्यांनी संवाद साधल्याची ऑडिओ क्लीपही व्हायरल झाली आहे.

                   संजय गायकवाड यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. संजय गायकवाड यांनी माफी मागतली पाहिजे अन्यथा राज्यातील सर्व वारकरी मंडळी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा वारकरी संप्रदायाने दिला आहे. तर तुम्हाला काय वाटायचं ते वाटू दे. पण मी रोज 20-25 जणांच्या अस्थी जाळू लागलो, तुमच्या लोकांची श्रद्धा आहे हे मला माहितीये, पण मी जे बोललो ते वास्तव आहे. मी पण नास्तिक नाही परंतु काळाची गरज आहे ते बोललो, असं संजय गायकवाड म्हणाले.

दरम्यान, कोरोनाकाळात मंदिरंही बंद आहेत. देव पण लॉक करण्यात आले आहेत. तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. स्वत:ची काळजी स्वत:लाच घ्यायची आहे. त्यामुळे उपास तापास बंद करा, रोज 4 अंडे खा. एक दिवसाआड चिकन खा आणि प्रोटिनयुक्त भरपूर खा असा सल्ला संजय गायकवाड यांनी लोकांना दिला आहे. काही दिवसांपूर्वी मला कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी ते देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते, असं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं होतं.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close