#Corona

पुढील साडेतीन ते चार महिने अत्यंत महत्वाचे……!

नवी दिल्ली दि.१६ – केंद्राने पुन्हा कोरोना विषाणूच्या साथीविषयी देशवासियांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की,” पुढचे 100-125 दिवस फार महत्वाचे असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लोकांना कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.” केंद्राने म्हटले आहे की, “अलिकडच्या काळात देशात कोरोनाच्या घटनांमध्ये घट होण्याचे प्रमाण कमी झाले आहे आणि तिसऱ्या लाटेचा इशारा म्हणून ही काळजी घेणे आवश्यक आहे.”

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल म्हणाले की,”हर्ड इम्युनिटी अद्यापपर्यंत पोहोचलेली नसल्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी बोलले जात आहे. मोठ्या लोकसंख्येस संसर्ग होण्याचा धोका असतो. आपल्याला संसर्गाच्या मार्गाने हर्ड इम्युनिटी गाठायची नाही. केसेस घटण्याची गती मंदावली आहे. कोविडशी संबंधित वर्तन अत्यंत महत्वाचे आहे जेणेकरून परिस्थिती आणखी खराब होणार नाही.” ते म्हणाले की,” पुढील 100-125 दिवस खूप महत्वाचे आहेत, म्हणून प्रत्येकाने सावध राहून जबाबदारी स्वीकारली पाहिजे.”

पुढे बोलताना डॉ.व्ही.के. पॉल म्हणाले की,”जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) डेटाचे विश्लेषण करताना सांगितले आहे की,”जग तिसर्‍या लाटेकडे जात आहे.” पॉल, WHO च्या आकडेवारीचा हवाला देताना म्हणाले की,” स्पेनमध्ये एका आठवड्यात 64% प्रकरणे वाढली आहेत. त्याचप्रमाणे नेदरलँड्समध्येही कोरोनाच्या बाबतीत 300% वाढ झाली आहे. ते पुढे म्हणाले कि,” WHO चा इशारा जागतिक आहे. आपल्याला तो समजून घ्यावा लागेल आणि त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आपण अवलंबल्या पाहिजेत.”

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close