हवामान

सांडव्याच्या पाण्यामुळे नदीला पूर, पुलावरून पाणी वाहत असल्याने संपर्क तुटला…….!

बीड दि.26 –  मागच्या कांही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. जिल्ह्यातील लहान मोठे सर्वच तलाव तुडुंब भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. मांजरा धरणाचेही 6 दरवाजे उघडले असून दिवसेंदिवस पाण्याचा विसर्ग वाढवावा लागत आहे. तर वडवणी तालुक्यातील कुंडलिका प्रकल्प तुडुंब भरला असून सांडव्यातून पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू आहे.

            दरम्यान रात्रीही जिल्ह्यात सर्वदूर आणि दमदार पाऊस झाल्याने कुंडलिका नदीला मोठा पूर आल्याने उपळी हुन वडवणी, माजलगाव कडे जाणाऱ्या पुलावरून डोक्याइतके पाणी वाहत असल्याने संपूर्ण संपर्क तुटला होता. तर नदीच्या आजूबाजूला असलेल्या शेतात पाणी घुसल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात आणखी तीन चार दिवस पावसाचा मुक्काम राहणार असल्याचा अंदाज वर्तवल्याने ओल्या दुष्काळा चा सामना करावा लागणार आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close