आपला जिल्हा

…..अन्यथा ना.धनंजय मुंडे यांच्या गाडीखाली जीव देणार

शहिद विरपत्नीचा निर्वाणीचा इशारा

बीड दि.१४ – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी 8 दिवसात जमीन मिळेल असं आश्वासन देऊन 8 महिने उलटून गेले आहेत. मात्र अजूनही मला न्याय मिळालेला नाही म्हणून 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी धनंजय मुंडे यांच्या गाडीखाली जीव देणार असल्याचा इशारा शहिद वीरपत्नी भाग्यश्री राख यांनी दिला आहे. शहिदांच्या वारसांना दोन हेक्टर जमीन देण्यात यावी असा शासननिर्णय असतानाही बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील संथ कारभारामुळे भाग्यश्रींनी आता टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा दिला आहे.

पाटोदा तालुक्यातील भाग्यश्री राख गेली दोन वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात खेटे मारत आहेत. आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्त केली असतानाही त्यांच्या फाईलवर अद्याप सहीच झालेली नाही. पाटोदा तालुक्यातील शहीद जवान तुकाराम राख यांना 2010 मधील ऑपरेशन रक्षकमध्ये वीरमरण आले. स्वतःचा पती गेल्यानं घरावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही वीरपत्नी भाग्यश्री कुटूंबाचा गाडा चालवतच राहिल्या. शहिदांच्या वारसांना शासनाकडून 2 हेक्टर जमीन देण्यात यावी, असा निर्णय आहे. पण अधिकारी कुठे ही सहकार्य करत नाहीत. उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा खेद भाग्यश्री यांनी व्यक्त केला.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close