महाराष्ट्र

राज्य मंत्रिमंडळाने शिफारस केलेल्या 12 सदस्यांबाबत निर्णय कधी घेणार आहात ? मुंबई उच्च न्यायालयाचा प्रश्न…..! 

मुंबई दि.21 – विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीच्या वादावरुन मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सचिवांना प्रश्न विचारलाय. राज्य मंत्रिमंडळानं शिफारस केलेल्या 12 सदस्यांबाबत निर्णय कधी घेणार आहात? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या 6 महिन्यांपासून सुरु असलेल्या वादावर आता तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपालांच्या सचिवांनाच प्रश्न केल्यानं याबाबत आता हालचाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

6 नोव्हेंबर 2020 मध्ये राज्य मंत्रिमंडळाने विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त सदस्य पदासाठी 12 नावांची शिफारस केली होती. मात्र, राज्यपालांकडून त्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. या प्रकरणात नाशिकच्या रतन सोली यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यावेळी राज्य मंत्रिमंडळाने 12 जणांच्या नावांची शिफारस 6 नोव्हेंबर 2020 ला केली असताना त्याबाबत अद्याप का निर्णय घेतला नाही? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close