राजकीय

येत्या दोन दिवसांत हादरे देणारी पत्रकार परिषद घेऊन “या” विषयी मोठे खुलासे करणार – चंद्रकांत पाटील यांनी केले जाहीर……!

मुंबई दि.१९ – ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच सर्वाच मोठा पक्ष ठरला असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ग्रामपंचायत निवडणुकींच्या निकालावर भाजपची भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघांतील गैरप्रकारांबाबत मोठा दावा केला आहे.

पदवीधर निडणुकीत महाविकास आघाडीने गैरप्रकार केले. या निवडणुकीतील गैरप्रकारांचा उलगडा करणारी मोठे हादरे देणारी पत्रकार परिषद मी येत्या दोन दिवसांत घेणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.काही ठिकाणी एकाच व्यक्तीची नावे मतदार यादीत अनेकदा आलेली होती. काही ठिकाणी कोऱ्या मतपत्रिका आल्या, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close