शेती

पिकांचे पंचनामे करून सरसकट मदत द्या…..! 

मांजरा विकास परिषदेची मागणी

केज दि.26 – मागील आठ दिवसापासून केज तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे मांजरा पट्ट्यासह उंदरी नदीला पूर
आल्याने मोठे नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी मांजरा विकास परिषदेच्या वतीने प्रवीण खोडसे यांनी केली आहे.
         जिल्ह्यात चांगल्या प्रकारचा पाऊस झाल्याने तीन जिल्ह्यांची तहान भागवणारे मांजरा धरण सलग दुसऱ्या वर्षी 100% भरले पण अतिरिक्त पाऊस पडल्यामुळे मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडावे लागले आहेत.
त्यामुळे धरणाच्या खालच्या भागातील शेतात पाणी गेल्याने शेतांचे नुकसान होऊन हातात आलेले पीक शेतकऱ्यांना गमवावे लागत आहे. त्याचबरोबर अति पावसामुळे उंदरी नदीला पूर येऊन शेजारच्या शेतात देखील पाणी जाऊन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर उंदरी नदीवरील नायगाव सौंदना या दोन गावांना जोडणारा पूल पुराच्या पाण्याने खचून जाऊन पुलाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे चारचाकी वाहनांना जाण्या येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. जीव मुठीत धरून पुलावरून जावे लागत आहे. तसेच मांजरा नदीवरील  सौंदना येथील बंधाऱ्याचे दरवाजे पुराच्या प्रवाहाने तुटून गेले आहेत.
              त्या सर्व बाबींची प्रशासनाने तात्काळ नोंद  घेऊन शेतीपिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यासह नायगाव सौंदना रोडवरील पुलाच्या दुरुस्तीचे  काम तात्काळ मार्गी लावावे अशी मागणी मांजरा विकास परिषदेचे अध्यक्ष प्रवीण खोडसे, अमोल गोरे, ऍड. राघवेंद्र भिसे, भगवन्त मोरे यांनी केली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close