शेती

शेतकऱ्यांनो उसाचे पाचट जाळू नका…..! 

10 / 100
माळेगाव दि.४ – (बळीराम लोकरे) – केज तालुक्यात सध्या ऊस तोडणी हंगाम सुरू आहे. ऊस गाळपाला गेल्यानंतर शिल्लक राहिलेले पाचटीची आंतर मशागत करताना अडचण येते म्हणून शेतकरी ते जाळून टाकतात. याचे अनेक दुष्परिणाम जमिनीवर होतात.परंतु शेतकऱ्यांनी शेतातील पाचट जाळून न टाकता त्याची कुटी करून जमिनीत कुजविणे फायदेशीर असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
                उसाची तोडणी झाल्यानंतर  मोठ्या प्रमाणावर पाचट शिल्लक राहते. बहुतांश शेतकरी ते पाचट जाळून टाकतात. परिणामी जमिनीतील असंख्य जिवाणूंचा नाश होतो आणि जमिनीचे आरोग्य देखील बिघडते. पाचट न जाळता पाचट कुटी करून ते जमीनींत कुजवण्याचे नियोजन  केल्यास जमिनीचे तापमान नियंत्रित ठेवता येते.ओलावा टिकून राहतो. पाचट जमिनीत कुजल्यानंतर जमिनीतील मातीच्या कणाची रचना सुधारून जमीन भुसभुशीत होते.यामुळे जिवाणूंच्या संख्येत वाढ होते.तसेच जमिनीतील नत्र स्थिरीकरणाचे, स्फुरद व पालाश उपलब्धतेचे प्रमाण वाढून पिकांस अन्नघटकांचा पुरवठा होत असल्यामुळे उत्पादनात वाढ होते. त्याशिवाय रासायनिक खते २५ ते ३० टक्के कमी द्यावी लागतात.
  “उसाचे पाचट जाळल्याने जमिनीचे नुकसान होते. तसेच लाभदायक जिवाणू नष्ट होतात.हवा प्रदूषण पण वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाचट न जाळता पाचट कुटी करून जमिनीत कुजविल्यास जमिनीचा पोत सुधारतो तसेच सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होऊन पिकांना आवश्यक अन्नघटक उपलब्ध होतात.तसेच जमिनीची सुपीकता वाढून उत्पादन वाढण्यास मदत होते.त्यामूळे शेतकऱ्यांनी पाचट न जाळता पाचट  व्यवस्थापन करणे फायदेशीर आहे.”
              सागर पठाडे
  तालुका कृषी अधिकारी केज.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close