महाराष्ट्रराजकीय

वेळ आलीच तर शरद पवार सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील, अजित दादांना नाही……!

मुंबई दि.२४ – मागच्या दोन दिवसानंतर पुन्हा एकदा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर  निशाणा साधलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करण्याची वेळ आलीच तर शरद पवार अजितदादांना नाही तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलंय.

राज्यात गेल्या वर्षी भाजपाकडून करण्यात आलेल्या सत्तास्थापनेच्या अयशस्वी प्रयत्नाला वर्ष पूर्ण झालं. यांसदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कितीही गोडवे गायले तरीही गेल्या वर्षी 3 दिवसांसाठी का होईना अजितदादांनी काकांना सोडलं होतं आणि हा आता इतिहास आहे.” राष्ट्रवादी काँग्रेस ही दरबारी लोकांची पार्टी आहे आणि भाजपा हा सामान्य लोकांचा पक्ष आहे, अशी टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

“गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मी कोथरुडला अडकलो होतो. त्यामुळे इस्लामपुरात जास्त लक्ष देता आलं नाही. नाहीतर इस्लामपुरात जयंत पाटील यांची सुट्टी केली असती मग ते केवळ तालुक्याचे नेते राहिले असते,” असा टोलाही पाटील यांनी लगावलाय.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close