आपला जिल्हा

पूल वाहुन गेल्याने शाळा दवाखान्यासह दोन गावाचा संपर्क तुटला…..!

5 / 100
बीड दि.9 – दोन दिवसापूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीवरील पूल वाहून गेल्याने जिल्हा परिषद शाळा, रामेश्वर विद्यालय, आरोग्य उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखान्यासह दोन गावाचा संपर्क तुटला आहे.
                तालुक्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पावसामुळे विजेचे खांब उन्मळून पडले असल्याने गेल्या आठ दिवसापासून परिसरामध्ये विज गायब झाली आहे. अनेक पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. रविवारी रात्री सरस्वती नदीवरील पूल वाहून गेल्याने उमरी येथील जिल्हा परिषद शाळा, रामेश्वर विद्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना, आरोग्य उपकेंद्र, ग्रामपंचायत सह दोन गावाचा संपर्क तुटला आहे. यामुळे शाळेत विद्यार्थी घेऊन जाण्यासाठी पालकांना कसरत करावी लागत आहे. हा पूल गेल्या अनेक दिवसापासून मोडकळीस आला होता.रविवार रोजी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पुल वाहुन गेला आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने या पुलाचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close