शेती

दुष्काळाची झळ तर सर्वांनाच मात्र जिल्ह्यातील केवळ तिनच तालुक्यात दुष्काळाची दुसरी कळ…..!

6 / 100
बीड दि. १४ – यंदा पावसाने पाठ फिरविल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात पिकांचे नुकसान झालेले आहे, तसेच तलावांमधील पाणीसाठा देखील पुरेसा नाही, संपूर्ण जिल्ह्यातच हंगामी पैसेवारी देखील ५० पैशांपेक्षा कमी आहे. असे असताना राज्यातील दुष्काळाची दुसरी कळ लागू झालेल्या तालुक्यांच्या यादीत मात्र बीड जिल्ह्यातील केवळ ३ तालुक्यांचा समावेश झाला आहे. या तालुक्यांमधील पिकांच्या नुकसानीची माहिती कृषी आयुक्तालयाने मागविली आहे.
             राज्यातील ४२ तालुक्यांमध्ये दुष्काळाची दुसरी कळ दिसत असल्याचा प्रशासनाचा अहवाल आहे.
चालू वर्षाच्या खरीप हंगामात संगणकीय प्रणालीद्वारे दुष्काळाचे मूल्यांकन केले जात आहे. यात पावसाची परिस्थिती, पावसामधील खंड, त्या काळातील उष्मा, आर्द्रता आदी बाबींचा विचार करून दुष्काळाची कोणती कळ लागू होते हे पहिले जाते. आणि त्यानुसार त्या परिसरात दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात शासन निर्णय घेते. त्या मूल्यांकनामध्ये बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, धारूर आणि वडवणी या तीन तालुक्यात दुष्काळाची दुसरी कळ लागू झाली असल्याचे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. राज्यातील ४२ तालुक्यांमध्ये हे चित्र आहे. आता या तालुक्यांमधील पिकांचे नेमके किती नुकसान झाले याचे रँडम १० गावांमध्ये पंचनामे करून अहवाल देण्याचे निर्देश कृषी आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकारी आणि अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मराठवाड्यातील या तालुक्यांचा समावेश

बीड : अंबाजोपगाई, धारूर , वडवणी
छत्रपती संभाजीनगर : सोयगाव , छत्रपती संभाजी नगर
धाराशिव : लोहारा , धाराशिव, वाशी
लातूर : रेणापूर
जालना : अंबड, बदनापूर , भोकरदन , जालना, मंठा

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close