आरोग्य व शिक्षण

दहावी बारावी परीक्षेची वेळ बदला…….!

बीड दि.५ – शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील बारावी आणि दहावीच्या परीक्षा अनुक्रमे २३ एप्रिल आणि २९ एप्रिलपासून होणार आहेत. दरवर्षी फेब्रुवारी- मार्चमध्ये होणाऱ्या या परीक्षा यंदा एप्रिल- मे महिन्यात होत आहेत. राज्यभर एप्रिल- मे महिन्यात कडक उन्हाळा असतो. त्यामुळे पेपरच्या वेळा बदलण्याची मागणी शिक्षक भारती संघटनेने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कडक उन्हाळा आणि राज्यातील अनेक भागातील वाढत्या तापमानाची परिस्थिती लक्षात घेऊन बारावी व दहावीच्या वार्षिक परीक्षा सकाळी लवकर म्हणजे सकाळी ८ वाजता सुरू करण्याबाबत नियोजन करावे, असेही सांगण्यात आले.

निवेदनावर माध्यमिक शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष अनिल देशमुख, अमरसिंग चंदेल, गणेश राठोड, विकास तावरे, विश्वास शेळके, ईश्वर खेडकर, सिद्धार्थ घुगे, भाऊसाहेब घोलप, श्याम खोसरे, परमेश्वर क्षीरसागर, दिलीप गायकवाड, संदीप तुंबारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close